वटपौर्णिमा सणाच्या दिवशी स्त्रिया हातावर मेंदी काढतात. नवीन साडी घालतात व गजरे लावतात, शृंगार करतात. या दिवशी बारा वाजेपासून पूजा करण्यास सुरुवात होते. पूजेचे ताट घेऊन वडाच्या झाडाजवळ जातात व ताटामध्ये तांदूळ किंवा गहू, भिजलेले चणे, मिठाई, विड्याचे पाणी, पाच प्रकारची फळे, तुपाचा दिवा, दूध एका भांड्यात पाणी, दुर्वा आणि अगरबत्ती हे सर्व सामान घेऊन जातात. त्यानंतर वडाच्या झाडाचे मनोभावाने पूजा करतात.